आंबेगाव खेड जुन्नर ताज्या घडामोडी पुणे महाराष्ट्र मावळ राजकीय शिरूर

जोपर्यंत वळसे पाटील आम्ही सर्व एकत्र येत नाही, तोपर्यंत बैलगाडा…

मंचर, पुणे – जोपर्यंत वळसे आणि पाटील आम्ही सर्व एकत्र येत नाही, तोपर्यंत बैलगाडा मालकांचं शंका निरसन होणार नाही. असं वक्तव्य माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंचर येथील ग्रामीण रुग्णालयायाच्या उद्घाटन प्रसंगी केले आहे. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील जिथं जिथं बैलगाडा मालकांवर खटले दाखल झाले असतील ते खटले मागे घेण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

बैलगाडा शर्यत बंदी उठवावी यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे, परंतु बैलगाडा शर्यत बंदीचा मुद्दा आता तापला आहे. बैलगाडा मालक आक्रमक झालेले आहेत. काल (दि. २०) रोजी आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला गुंगारा देत झरे गावामध्ये बैलगाडा शर्यत भरवली होती. त्याला राज्यातील बैलगाडा मालकांनी पाठिंबा दिला, मात्र आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आढळराव पाटील यांनी देखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात बैलगाडा शर्यती भरावणार असल्याचे सांगितले होते. परंतु यावेळी वळसे पाटील यांनी जिथं जिथं बैलगाडा मालकांवर खटले दाखल झाले असतील ते खटले मागे घेण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले पण पुन्हा खटले दाखल होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

बैलगाडा सुरू व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे खासदार डॉ. अमोल कोल्हे पाठपुरावा करत आहेत तर कोणतेही राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन न्यायालयीन लढाई करून हा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे ही न्यायालयीन लढाई आहे या सगळ्या गोष्टी बैलगाडा मालकांना समजून सांगण्याची गरज असल्याचे मत माजी खासदार आढळराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.

error: Copying content is not allowed!!!